• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव तहसीलदारांना ‘गो सन्मान’ अभियानाचे निवेदन

ज्योतिदेवी गौ सेवा आश्रमाचा पुढाकार

खान्देशदूत by खान्देशदूत
April 29, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव तहसीलदारांना ‘गो सन्मान’ अभियानाचे निवेदन
0
SHARES
222
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – तालुक्यातील ज्योतिदेवी गौ सेवा आश्रम गोशाळेच्या वतीने ‘गो सन्मान’ अभियानानिमित्त सोमवारी धरणगाव तहसील कार्यालयात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गोवंश संरक्षण आणि संवर्धनासाठी समाजाचा व शासनाचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक व्हावा, या प्रमुख उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे.

गोसेवकांचा सक्रिय सहभाग

धरणगाव येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी गो सेवक जीवनसिंह बायस, प्रा.डी.आर.पाटील, ऍड.वसंतराव भोलाणे, ऍड.संदिप पाटील, नगरसेवक सुनील चौधरी, गो रक्षक प्रथमेश सुर्यवंशी, बालू महाजन, अक्षय मुथा, राजू ओसवाल, ह.भ.प.मेघनाथ ठाकरे, श्रीपाद पांडे, विश्वास बसत, आकाश तिवारी, विनोद जैन, शैलेश ओसवाल, प्रमोद चौधरी, यशवंत महाजन, भोला महाजन, शाम भाटिया, यांच्यासह मोठ्या संख्येने गोप्रेमी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गोशाळेच्या कार्याची माहिती देत, गोवंशाच्या रक्षणासाठी स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे आणि गोसेवेला व्यापक स्वरूप मिळावे, अशी मागणी करण्यात आली.

काय आहे ‘गो सन्मान’ अभियान?

भारतीय संस्कृतीत गाईला असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि भटक्या गोवंशाच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. ज्योति देवी गौ सेवा आश्रम गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आणि निराधार गाईंची सेवा करत असून, या अभियानाद्वारे लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘गोसेवा हा केवळ धार्मिक विषय नसून तो आपल्या पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा कणा आहे. प्रत्येक नागरिकाने गो संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे,’ असे मत यावेळी जीवन सिंह बायस यांनी व्यक्त केले.

निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार रेवना कांबळे यांनी या विषयावर सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी धरणगाव परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि समर्पित गो सेवक उपस्थित होते.

Previous Post

धरणगाव येथे मंगळवारी रामेश्वर भदाणे यांचे व्याख्यान

Next Post

धरणगाव नूतन सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन वामन बिऱ्हाडे यांचे निधन

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगाव नूतन सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन वामन बिऱ्हाडे यांचे निधन

धरणगाव नूतन सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन वामन बिऱ्हाडे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 18, 2026
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

July 18, 2026
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

July 15, 2026
धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

July 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914