• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रशासनातील वाद गंभीर वळणावर

२४ तासात नोटीसचे उत्तर न दिल्यास माघ मेळ्यात कायमची बंदी

खान्देशदूत by खान्देशदूत
January 22, 2026
in राष्ट्रीय
0
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रशासनातील वाद गंभीर वळणावर

Prayagraj: Shankaracharya Protests at Magh Mela

0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रयागराज – येथे सुरू असलेल्या असलेल्या माघ मेळ्यात प्रशासन आणि शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यातील वाद आता गंभीर टप्प्यात पोहोचला आहे. प्रयागराज मेळा प्राधिकरणाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना आणखी एक नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये त्यांना दिलेल्या सुविधा रद्द करण्याचा इशारा दिला आहे, तसेच भविष्यात मेळ्यात प्रवेशावर पूर्ण बंदी घालण्याचीही मोठी धमकी दिली आहे. ही नोटीस मौनी अमावस्येच्या दिवसाची आहे, जी आता समोर आली आहे.

ही नोटीस ‘श्री शंकराचार्य आश्रम शाकंभरी पीठ सहारनपुर’ आणि ‘बद्रिका आश्रम हिमालय सेवा शिबिर मनकामेश्वर मंदिर’ या शिबिर संचालकांच्या नावाने जारी करण्यात आली आहे.

– नोटीसमध्ये करण्यात आलेले आरोप –

नोटीसमध्ये प्रशासनाने आरोप केला आहे की, १८ जानेवारीला मौनी अमावस्येच्या मुख्य स्नान पर्वावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी परवानगीशिवाय पांटून ब्रिज क्रमांक २ वरील बैरियर तोडले आणि संगम अपर मार्गावर मोठ्या गर्दीसमवेत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाचे म्हणणे आहे की, जास्त गर्दीच्या वेळी स्वामी अविमुक्तेश्वरानंद बग्घीने स्नान करण्यासाठी जाण्यावर आग्रही होते, ज्यामुळे मेळ्यात भगदड होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

– कठोर कारवाईचा इशारा –

या नोटीसमध्ये सर्वात महत्त्वाची आणि कठोर गोष्ट म्हणजे, मेळा प्राधिकरणाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याकडून २४ तासांच्या आत उत्तर मागितले आहे. नोटीसमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर ठरलेल्या वेळेत उत्तर मिळाले नाही, तर त्यांच्या संस्थेला मेळ्यात देण्यात आलेली जमीन आणि इतर सर्व सरकारी सुविधा तात्काळ प्रभावाने रद्द केल्या जातील. इतकेच नाही, तर भविष्यात कायमचे माघ मेळ्यात प्रवेशावर पूर्ण बंदी घालण्याचाही कठोर इशारा दिला आहे.

Previous Post

मोफा कायदा रद्द करण्यासाठीची प्रलंबित याचिका फेटाळली

Next Post

धरणगाव येथील महात्मा फुले विद्यालयात महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगाव येथील महात्मा फुले विद्यालयात महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन

धरणगाव येथील महात्मा फुले विद्यालयात महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

June 2, 2026
भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

June 2, 2026
​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

May 31, 2026
धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

May 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914