धरणगाव, प्रतिनिधी – येथील प.रा.हायस्कूल सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि.२१ जानेवारी) पी.एम.उषा अंतर्गत शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, शैक्षणिक धोरणाचे प्रचार आणि प्रसार,भाषा विषयाचे महत्व इत्यादी विषयांवर विद्यापीठस्तरीय डॉ.गुणवंतराव सोनवणे,डॉ.संदीप माळी, डॉ.आशुतोष पाटील, डॉ.दीनानाथ पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ.सुरेखा पालवे, डॉ.कुणाल इंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी.विभाग व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे पी.एम. उषा अंतर्गत शैक्षणिक धोरण २०२० या चर्चासत्राच्या आयोजन करण्यात आलेले आहे, यासाठी महाविद्यालयातील सर्व शाखेचे विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा असे आयक्यूएसी समन्वयक प्रा. संदीप पालखे यांनी आवाहन केले. या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे याबाबत प्राचार्य उदय जगताप यांनी सखोल मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य डॉ. उदय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक धोरण २०२० या कार्यशाळेसाठी विविध समित्यांच्या आयोजन करण्यात आले आहे.





